• Fri. Mar 6th, 2026

    Navi Mumbai International Airport : शिवरायांच्या राज्याभिषेकासह लोककला अन् कोल्हापूर लावणी; नवी मुंबई विमानतळावर PM मोदींसमोर होणार मराठमोळा जल्लोष

    Navi Mumbai International Airport : शिवरायांच्या राज्याभिषेकासह लोककला अन् कोल्हापूर लावणी; नवी मुंबई विमानतळावर PM मोदींसमोर होणार मराठमोळा जल्लोष

    Navi Mumbai International Airport : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ एकूण 1160 हेक्टरवर विमानतळ उभारले आहे. दरम्यान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळचे फोटो समोर आले आहेत.

    नवी मुंबई : Navi Mumbai International Airport भव्य उद्घाटन उद्या बुधवारी रोजी दुपारी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी पनवेल, उरणसह नवी मुंबई परिसरातील नागरिक आणि भाजप महायुतीचे २५ हजारांहून अधिक कार्यकर्ते मोठ्या उत्साहात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यासह राज्यातील विविध प्रांतांतील लोककला, नृत्य, संगीत आणि पारंपारिक वाद्यवृंद सादर होणार आहेत. या विमानतळाच्या उद्घाटन सोहळ्याला फक्त विकासाचा उत्सव नव्हे, तर महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा महाउत्सव आहे.

    विमानतळाच्या टर्मिनलसमोर महाराष्ट्राच्या लोककलेचा अप्रतिम संगम अनुभवता यावा, यासाठी सादरीकरणाचं आयोजन केलं आहे. या कार्यक्रमात राज्यातील विविध प्रांतांतील लोककला, नृत्य, संगीत आणि पारंपारिक वाद्य सादर होणार आहेत. तब्बल 60 कलाकार आपल्या कलेद्वारे महाराष्ट्राच्या वैविध्यपूर्ण संस्कृतीची झलक प्रेक्षकांसमोर सादर करतील. कोल्हापुरातील लावणी, आदिवासी तसेच आगरी कोळी नृत्यांच्या तालावर संपूर्ण परिसर रंगून जाणार आहे.

    सांगलीचे दोन भाऊ गोव्याला गेले, मजा केली, पण परतताना भलताच ‘उद्योग’; कोल्हापूर हद्दीत येताच पोलिसांनी ठोकल्या बेड्या

    पीपीपी मॉडेलवर तयार

    या प्रकल्पामुळे विमान वाहतूक, लॉजिस्टिक्स, आयटी, हॉस्पिटॅलिटी आणि रिअल इस्टेट यासारख्या क्षेत्रात 2 लाखाहून अधिक नोकऱ्या निर्माण होण्याची अपेक्षा आहे. यामध्ये अक्षय ऊर्जेचा वापर, पावसाच्या पाण्याची साठवणूक आणि निष्क्रिय शीतकरण प्रणाली यासारख्या अनेक शाश्वत वैशिष्ट्यांचा समावेश असेल. उद्या दुपारी 3:30 वाजता, पंतप्रधान मोदी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे औपचारिक उद्घाटन करतील. या कार्यक्रमादरम्यान, ते मुंबई आणि नवी मुंबईशी संबंधित अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांचं उद्घाटन करतील आणि सभेला संबोधित करतील.

    नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची वैशिष्ट्ये

    भारतातील सर्वात मोठा ग्रीनफिल्ड विमानतळ प्रकल्प.

    सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) मॉडेलवर बांधलेलं.

    अदानी एअरपोर्ट्स होल्डिंग्ज लिमिटेडची उपकंपनी – 74% भाग.

    सिडको – 26% भाग.

    विमानतळाचा पहिला टप्पा दरवर्षी 10 दशलक्ष प्रवाशांना हाताळण्यास सक्षम असेल.

    प्रतिवर्षी 90 दशलक्षाहून अधिक प्रवाशांना हाताळण्याच्या अंतिम क्षमतेपर्यंत त्याचा विस्तार केला जाईल.

    सर्व टर्मिनल ऑटोमेटेड पीपल मूव्हर (APM) द्वारे जोडले जातील.

    वॉटर टॅक्सी कनेक्टिव्हिटी असलेलं भारतातील पहिले विमानतळ.

    47 मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्प आणि शाश्वत विमान इंधन साठवणूक.

    हे विमानतळ 1160 हेक्टरमध्ये उभारलं आहे.

    पहिल्या टप्प्यात 2 कोटी प्रवासी क्षमता.

    पहिला टप्पा 19,647 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह पूर्ण झाला आहे.

    डिसेंबर 2025 पासून उड्डाणे सुरू होतील.

    Maharashtra Timesराज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, तुकडाबंदी कायद्यात सुधारण्यास मंजुरी, महाराष्ट्रातील छोट्या प्लॉट धारकांना दिलासा

    दरम्यान, नवी मुंबई विमानतळ ामुळे हवाई वाहतुकीची क्षमता वाढणार आहे आणि परिसरातील आर्थिक विकासाला गती मिळणार आहे. नवी मुंबई विमानतळ मुंबई महानगर प्रदेशासाठी एक महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा प्रकल्प आहे. नवी मुंबई विमानतळामुळे मुंबई विमानतळावरील 70 टक्के लोड कमी होणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा उपयोग विविध ऑपरेशनमध्ये केला जाणार आहे. जगातील सर्वात मोठ्या लंडन येथील हिर्थो विमानतळाशी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ाची तुलना करण्यात येत आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ पर्यावरणपूरक असेल, हरित उर्जेचा वापर आणि जलसंधारण यावर विशेष भर आहे.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत संजय पाटील २०१९ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये सिनीयर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील ग्रामीण भागातील बातम्या, राजकीय बातम्यांची आवड, हायपरलोकल बातम्या, क्राइम बातम्या अर्थात विशेष घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सतत प्रयत्न असतो. गावाखेड्याकडच्या बातम्या, शेतकऱ्यांचा प्रश्न, शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी थोडक्यात न्यूज पोर्टल, आधान न्यूज पोर्टल, महाराष्ट्र टाइम्स डिजिटल आणि सकाळ मीडिया ग्रुप या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून पुण्यातील गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed