परभणी जिल्ह्यात अतिवृष्टी आणि नद्याला आलेल्या पुरामुळे खरीपाच्या….पिकाचे प्रचंड नुकसान झाले. राज्य सरकारकडून हेक्टरी साडेआठ हजार…रुपये अनुदानाची घोषणा करण्यात आली. त्याचबरोबर पिक विमा देखील…शेतकऱ्यांना मिळेल अशी आशा नाहीये. त्यामुळेच चिडलेल्या शेतकऱ्यांनी…जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. हेक्टरी 50 हजार रुपये जाहीर करा… शेतीमालाला भाव द्या, खरिपाच्या पिकाचा सरसकट पिक विमा द्या आणि…निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाप्रमाणे सातबारा कोरा करा असं म्हणत…शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय दणाणून सोडले. या मोर्चात जिल्ह्यातील हजारो शेतकरी सहभागी झाले होते.