• Thu. Jun 18th, 2026

    मुसळधार पावसाचा अंदाज; मराठवाडा, विदर्भातही जोरदार बरसणार; IMD चा ताजा अंदाज

    मुसळधार पावसाचा अंदाज; मराठवाडा, विदर्भातही जोरदार बरसणार; IMD चा ताजा अंदाज
    मुंबई
     राज्यात आजपासून पुन्हा एकदा पाऊस सक्रिय होणार असून धुळे, नंदुरबार आणि जळगाव हे तीन जिल्हे वगळात राज्यातील इतर सर्वच जिल्ह्यांना हवामान विभागाकडून यलो अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून राजधानी मुंबईतही पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मुंबई शहर आणि उपनगरात आकाश साधारणतः ढगाळ राहील. तसंच काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि मेघगर्जनेसह वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे, असं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यामुळे विदर्भातही पावसाला सुरुवात झाली आहे. नागपुरातही पावसाच्या सरी बरसू लागल्या आहेत. ही स्थिती पुढील चार दिवस कायम राहणार असून चार दिवसांसाठी संपूर्ण विदर्भाला यलो अलर्ट देण्यात आला आहे. बुधवारी संध्याकाळी व मध्यरात्री दरम्यान गडचिरोली येथे दमदार पाऊस झाला. गुरुवारी सकाळी साडे आठ वाजेस्तोवर गडचिरोली येथे ६७.८ तर ब्रह्मपुरी येथे ४६ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. तसेच शहरात ३.९ मिमी पाऊस झाला. त्यानंतर गुरुवारूसुद्धा विदर्भात पाऊस झाला. यात गुरुवारी संध्याकाळी साडे पाच वाजेपर्यंत गोंदियात सर्वाधिक ३५ मिमी पावसाची नोंद करण्यात आली.

    मराठवाड्यात कशी असणार स्थिती?

    मराठवाड्यात दोन दिवसांपासून पावसाचा जोर कमी आहे. पावसाने उघडीप दिल्यामुळे पूर परिस्थिती निवळण्यास सुरुवात झाली आहे. अतिवृष्टीच्या तडाख्यात विभागात पाच दिवसात बारा जणांचा मृत्यू झाला आहे. दुधाळ जनावरे पुरात बुडून दगावल्याच्या घटनाही घडल्या आहेत. शेती वाहून गेल्यामुळे मराठवाड्यातील शेतकरी पूर्णत: कोलमडला आहे. मात्र आता पुन्हा पुढील तीन दिवस पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

    मराठवाड्यात दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. विभागात गुरुवारी स्वच्छ ऊन पडले होते. बहुतांश भागातील पूर परिस्थिती निवळत असून गावांचा दैनंदिन व्यवहार सुरळीत होण्यास वेळ लागणार आहे. लातूर, धाराशिव आणि बीड जिल्ह्यात पावसामुळे सर्वाधिक नुकसान झाले आहे. शेती पाण्यात वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांची अतोनात हानी झाली आहे. विशेषत: जमिनी खरवडून गेल्यामुळे पिकांसाठी सुपीक माती शिल्लक राहिलेली नाही. जमिनी पूर्ववत कशा करणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या २४ तासांत विभागात सरासरी १.३ मिलिमीटर पाऊस झाला आहे. नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक ३.२ मिमी पाऊस झाला आहे. छत्रपती संभाजीनगर २.३, जालना १.६, धाराशिव १.२ आणि परभणी जिल्ह्यात १.४ मिमी पाऊस झाला आहे. हिंगोली, लातूर, बीड जिल्ह्यात पाऊस थांबला आहे. अतिवृष्टीमुळे २० तलाव फुटले असून सहा पूल वाहून गेले आहेत. तसेच १३ रस्त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. काही गावांना पुराचा वेढा असून पाणी ओसरल्यानंतर नुकसानीची तीव्रता समोर येणार आहे. गणेश हाके, उद्धव लोखंडे, विश्वंभर हाके, सय्यद बाबू, धर्मराज नागरे, रवींद्र वाघ, विलास शेळके, कैलास साळुंके उपस्थित होते. येत्या २६ ते २८ सप्टेंबर दरम्यान पावसाचा अंदाज आहे.

    मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे पाच दिवसात १२ जणांचा मृत्यू झाला आहे. वीज पडून तीन, पुरात वाहून गेल्यामुळे सहा आणि इतर कारणांनी तीन अशा १२ जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत मिळालेल्या नोंदीनुसार ३५७ जनावरे ठार झाली आहेत. त्यात धाराशिव जिल्ह्यातील २०० जनावरांचा समावेश आहे. तसेच १४१६ मालमत्ता बाधित झाल्या आहेत.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed