• Sat. Jun 6th, 2026
    Devendra Fadnavis : होय, पवार साहेबांचा फोन आलेला, पडळकरांना सांगितलं की भविष्यात… फडणवीसांनी सर्व काही सांगितलं

    Devendra Fadnavis on Sharad Pawar : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते. यावरून शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करत नाराजी व्यक्त केली होती, त्यानंतर आता यावर देवेंद्र फडणवीस यांनी फोनबाबत सर्वकाही सांगितलं आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्यावर खालच्या भाषेत टीका केली होती. यावरून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जाहीर निषेध व्यक्त केला होता. सांगलीमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी या वक्तव्याचा निषेध करताना आंदोलन केले होते. तर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी थेट मुख्यमंत्र्यांना फोन केला होता. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

    गोपीचंद पडळकरांनी केलेलं वक्तव्य हे योग्य आहे असं माझं मत नाही. कोणाच्याही वडिलांबद्दल किंवा परिवाराबद्दल वक्तव्य करणं योग्य नाही, यासंदर्भात गोपीचंद पडळकर यांच्याशी मी बोललेलो आहे, त्यांना मी सांगितलं आहे की. मला पवार साहेबांचा फोन आला होता, मी त्यांनाही सांगितलं आहे की, अशा प्रकारच्या वक्तव्याचं आम्ही कधीच समर्थन करणार नाही. पडळकर हे तरूण नेते आहेत, अतिशय अॅग्रेसिव्ह नेते आहेत. अॅग्रेशन दाखवत असताना आपल्या बोलण्याचा नेमका काय अर्थ निघेल हे ते लक्षात घेत नाहीत, मी त्यांना सांगितलं आहे की हे लक्षात घेऊन अॅग्रेशन ठेवलं पाहिजे. भविष्यात चांगला नेता म्हणून मोठी संधी आहे म्हणून आपण बोलत असताना त्याचे काय अर्थ निघतील याचा विचार केला पाहिजे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
    Maharashtra TimesSharad Pawar : जयंत पाटलांवर बोलताना पडळकरांची जीभ घसरली, पवारांनी फिरवला मुख्यमंत्र्यांना फोन, म्हणाले…
    2005 पासून 2025 औद्योगिक वीजेचे दर सरासरी ९ टक्केने वाढले आहेत. आता 2025 ते 2030 मल्टिइयर टॅरिफ MARC ने मंजूर केलं आहे, त्यामुळे हे दर आता दरवर्षी ते २ ते ३ टक्क्याने कमी होणार आहेत. आजपेक्षा 2030 साली जवळपास १० टक्क्याने कमी होणार असल्याने ते उद्योगांना दिलासा मिळणार असल्याचंही फडणवीस यावेळी म्हणाले.
    Maharashtra Times‘अंतरवलीत पोलिसांवर दगडफेकीचा प्लॅन, पवारांचा आमदारही त्यात सहभागी’, छगन भुजबळ यांचा खळबळजनक आरोप
    ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्यावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेली टीका अत्यंत अश्लाघ्य आणि संतापजनक आहे. या माणसाला बोलताना कधीही कुठलंही तारतम्य नसतं आणि भाजपाच्या वरिष्ठांच्या पाठबळाशिवाय हे शक्य नाही. कुणाच्या घरापर्यंत जाण्याचा अधिकार यांना कुणी दिला? महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला गाळात घालण्याचं काम करणाऱ्या या आमदाराच्या वक्तव्याचा भाजपाकडून निषेध केला जातो का, हे आता पहावं लागेल. निषेध नाही केला तर त्यांना भाजपाचीच फूस असल्याच्या आमच्या म्हणण्यावर शिक्कामोर्तब होणार आहे. आम्ही मात्र त्यांच्या या बेताल वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध करतो, असं रोहित पवारा यांनी म्हटलं आहे.

    हरिश मालुसरे

    लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत. 2020 पासून पत्रकारितेच्या क्षेत्रात आहेत. राजकीय, स्पोर्ट्स, आणि क्राईम या विषयांच्या बातम्यांमध्ये विशेष आवड. पुण्यातील आबासाहेब गरवारे महाविद्यालयात पत्रकारितेमध्ये आपली पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर थोडक्यात, झी २४ तास, टीव्ही९ मराठी या माध्यमांमध्येही ऑनलाईन टीममध्ये काम केले आहे.… आणखी वाचा