Uddhav Thackeray on Asia Cup 2025 : आशिया कप मधील भारत पाकिस्तान सामना उद्या म्हणजेच रविवारी संध्याकाळी रंगणार आहे. मात्र या सामन्याआधी भारतात विरोधी पक्षातील नेत्यांनी या सामन्यावर बहिष्कार टाकण्यात यावा अशी मागणी केली आहे. ठाकरे सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यभर आंदोलन करणार असल्याचं सांगत पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.
पहलगाममध्ये जो हल्ला झाला त्यामधील मृतांचं रक्तही अजून सुकलेलं नाही, तो घाव अजूनही भरलेला नाही. त्यावेळी आपल्या सर्वांना असं वाटलं होतं की आता पाकिस्तानला जागेवर ठेवणार नाही. पाकिस्तानचे दोन-तीन तुकडे करू, त्या दृष्टीने एक युद्ध केला गेला आणि त्याला नाव ठेवण्यात आलं होतं ‘ऑपरेशन सिंदूर’. संरक्षण मंत्र्यांनी हे सांगितलं होतं की अजूनही ऑपरेशन सिंदूर हे सुरू आहे, पाकिस्तान नेहमी नेहमी काही दिवसांनी आपला हल्ला करतात त्यावेळी आपले सैनिक शौर्य दाखवतात. अमेरिकेचे राष्ट्रपती ट्रम्प म्हणतात की त्यांनी हे युद्ध थांबवलं, भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा याने पाकिस्तानच्या एका प्रशिक्षकाला भारतामध्ये आमंत्रण दिलं होतं. तो प्रशिक्षक आलेला की नाही याबद्दल माहिती नाही पण त्या नीरज चोप्रांना काही अंधभक्तांनी देशद्रोही म्हटलं होतं, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
Sanjay Raut : आशिया कपमधील भारत-पाक सामन्याआधी संजय राऊत यांचे मोठे विधान; महाराष्ट्रातच नाहीतर संपूर्ण देशात…
ज्या पाकिस्तान सोबत आपण युद्ध पुकारलं होतं त्याच पाकिस्तान सोबत आपण मॅच खेळत आहोत. ऑपरेशन सिंदूर झाल्यावर मोदींनी सर्व ते जगात सर्वपक्षीय खासदारांना पाठवला होता आणि पाकिस्तान आमच्या इथे दहशतवाद पसरवत आहे हे सांगितलं होतं. आता उद्याच्या सामन्यावर मोदीजींचं काय म्हणणं आहे. मला वाटतं ही देशभक्तीची कट्टा असून व्यापार चालला आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि गृहमंत्री अमित शहा हे युद्ध थांबलो असं जाहीर करणार आहेत का? असंही ठाकरे म्हणाले आहेत.

