• Sun. Mar 8th, 2026

    Weather Update: मान्सूनचा १५ सप्टेंबरपासून परतीचा प्रवास; आगामी 3 दिवस राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता, काय सांगतो IMDचा अंदाज

    Weather Update: मान्सूनचा १५ सप्टेंबरपासून परतीचा प्रवास; आगामी 3 दिवस राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता, काय सांगतो IMDचा अंदाज

    Maharashtra Weather Update: वायव्य भारतात कोरडे हवामान नोंदले जात असले, तरी बंगालच्या उपसागरात मात्र कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने महाराष्ट्रासह मध्य भारतात पुढील काही दिवस सर्वदूर पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

    monsoon return(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    मुंबई : यंदाच्या मान्सूनचा परतीचा प्रवास येत्या १५ सप्टेंबरपासून सुरू होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) शुक्रवारी वर्तवला. दुसरीकडे बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पुढील तीन दिवस सर्वदूर पावसाची शक्यता असल्याचेही विभागाने म्हटले आहे.

    पश्चिम राजस्थानातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होण्याची सर्वसाधारण तारीख १७ सप्टेंबर आहे. राजस्थानवर वातावरणाच्या खालच्या थरात जास्त दाबाचे क्षेत्र तयार होतानाच सलग पाच दिवस कोरडे हवामान नोंदले गेल्यास मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाल्याचे जाहीर केले जाते. यंदा सर्वसाधारण तारखेच्या दोन दिवस आधीच मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होऊ शकतो, असे हवामान विभागाने प्रसिद्ध केलेल्या अंदाजात म्हटले आहे.
    Maharashtra Timesहार्बरवर आज प्रवासकोंडी; साडेचौदा तासांचा ट्रॅफिक ब्लॉक, कोणत्या लोकलवर परिणाम? पाहा Timetable
    ‘आयएमडी’ने दिलेल्या माहितीनुसार, ‘वायव्य आणि लगतच्या मध्य बंगालच्या उपसागरात शुक्रवारी कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले. हे क्षेत्र पुढील दोन दिवसांत दक्षिण ओडिशा आणि दक्षिण छत्तीसगडकडे सरकण्याची शक्यता आहे. या क्षेत्राच्या प्रभावामुळे १३ सप्टेंबरला मराठवाड्यात, तर १४ आणि १५ सप्टेंबरला मध्य महाराष्ट्र आणि कोकणात सर्वदूर पावसाची शक्यता आहे.

    ‘आयएमडी’च्या लघु आणि मध्यमकालीन अंदाजानुसार सध्याच्या कमी दाबाच्या क्षेत्रापाठोपाठ बंगालच्या उपसागरात २० सप्टेंबरच्या दरम्यान आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. त्या क्षेत्रामुळे राज्यातील पावसात पुन्हा वाढ होऊ शकते. राज्यातून मान्सून माघारी फिरण्याचा सर्वसाधारण कालावधी ५ ते १४ ऑक्टोबर आहे. पावसाची सध्याची स्थिती पाहता राज्यातून मान्सून सर्वसाधारण वेळेआधी माघारी फिरण्याची शक्यता कमी असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे.
    Maharashtra TimesDasara Melava: शिवसेना UBTचा दसरा मेळावा शिवाजी पार्कमध्येच; मुंबई महापालिकेने दिली परवानगी
    खरिपाचा पीकपेरा ९९ टक्के
    मुंबई:
    राज्यातील खरीप हंगामातील एकूण १ कोटी ५७लाख ४७ हजार ८६२ हेक्टर पेरणी क्षेत्रापैकी तब्बल १ कोटी ४५ लाख ४४ हजार ७२१ हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. यात उस लागवडीचाही समावेश आहे. मागील वर्षाच्या तुलनेत तब्बल ९९ टक्के पेरणी पूर्ण झाली असून, गेल्या पाच वर्षांची सरासरी लक्षात घेता हे प्रमाण ९२ टक्के आहे.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा