Maharashtra Weather Update: वायव्य भारतात कोरडे हवामान नोंदले जात असले, तरी बंगालच्या उपसागरात मात्र कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने महाराष्ट्रासह मध्य भारतात पुढील काही दिवस सर्वदूर पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पश्चिम राजस्थानातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होण्याची सर्वसाधारण तारीख १७ सप्टेंबर आहे. राजस्थानवर वातावरणाच्या खालच्या थरात जास्त दाबाचे क्षेत्र तयार होतानाच सलग पाच दिवस कोरडे हवामान नोंदले गेल्यास मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाल्याचे जाहीर केले जाते. यंदा सर्वसाधारण तारखेच्या दोन दिवस आधीच मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होऊ शकतो, असे हवामान विभागाने प्रसिद्ध केलेल्या अंदाजात म्हटले आहे.
हार्बरवर आज प्रवासकोंडी; साडेचौदा तासांचा ट्रॅफिक ब्लॉक, कोणत्या लोकलवर परिणाम? पाहा Timetable
‘आयएमडी’ने दिलेल्या माहितीनुसार, ‘वायव्य आणि लगतच्या मध्य बंगालच्या उपसागरात शुक्रवारी कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले. हे क्षेत्र पुढील दोन दिवसांत दक्षिण ओडिशा आणि दक्षिण छत्तीसगडकडे सरकण्याची शक्यता आहे. या क्षेत्राच्या प्रभावामुळे १३ सप्टेंबरला मराठवाड्यात, तर १४ आणि १५ सप्टेंबरला मध्य महाराष्ट्र आणि कोकणात सर्वदूर पावसाची शक्यता आहे.
‘आयएमडी’च्या लघु आणि मध्यमकालीन अंदाजानुसार सध्याच्या कमी दाबाच्या क्षेत्रापाठोपाठ बंगालच्या उपसागरात २० सप्टेंबरच्या दरम्यान आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. त्या क्षेत्रामुळे राज्यातील पावसात पुन्हा वाढ होऊ शकते. राज्यातून मान्सून माघारी फिरण्याचा सर्वसाधारण कालावधी ५ ते १४ ऑक्टोबर आहे. पावसाची सध्याची स्थिती पाहता राज्यातून मान्सून सर्वसाधारण वेळेआधी माघारी फिरण्याची शक्यता कमी असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे.
Dasara Melava: शिवसेना UBTचा दसरा मेळावा शिवाजी पार्कमध्येच; मुंबई महापालिकेने दिली परवानगी
खरिपाचा पीकपेरा ९९ टक्के
मुंबई: राज्यातील खरीप हंगामातील एकूण १ कोटी ५७लाख ४७ हजार ८६२ हेक्टर पेरणी क्षेत्रापैकी तब्बल १ कोटी ४५ लाख ४४ हजार ७२१ हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. यात उस लागवडीचाही समावेश आहे. मागील वर्षाच्या तुलनेत तब्बल ९९ टक्के पेरणी पूर्ण झाली असून, गेल्या पाच वर्षांची सरासरी लक्षात घेता हे प्रमाण ९२ टक्के आहे.

