Pune News : पुण्यात नीरा शहरात अहिल्यानगर-सातारा महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. यामध्ये मुलाला आणायला निघालेल्या गृहस्थाचा मृत्यू झाला आहे. त्यांच्यासह पत्नी देखील. ओव्हरटेक करताना त्यांची दुचाकी ट्रकच्या चाकाखाली आली. उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. नीरा पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे.
विजय साखरे हे पत्नी लता साखरे यांच्यासह होंडा शाईन (क्र. एम.एच. ११-सी.झेड ३१०२) वरुन वरवंड (ता. दौंड) येथील आश्रमशाळेत आपल्या सहावीत शिकणाऱ्या १२ वर्षीय मुलाला भेटण्यासाठी गेले होते. परतताना ट्रक (क्र. एम.एच. २०-जी.सी. ७८११) ला ओव्हरटेक करताना त्यांची दुचाकी घसरली. विजय ट्रकखाली सापडले, तर लता रस्त्यावर कोसळल्या. विजय यांनी हेल्मेट घातले होते, पण अपघातात ते डोक्यातून निघाले, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे.
Akola Accident : गणपती विसर्जन करुन परतताना काळाची झडप, भीषण अपघातात तरुणाचा मृत्यू; गावात शोककळा
अपघातात विजय यांना प्रचंड रक्तस्त्राव झाला आहे. जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले असता, गंभीर अवस्था पाहून डॉक्टरांनी त्यांना लोणंद येथे हलवले, पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. नीरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक उपनिरीक्षकांनी घटनास्थळी भेट देत दोन्ही वाहने ताब्यात घेतली. विजय साखरे हे वाई एम.आय.डी.सी.मध्ये दोन महिन्यांपासून कामगार म्हणून कार्यरत होते. ऐन गणेश विसर्जनादिवशी झालेल्या अपघाताने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
अकोल्यातही गणेश विसर्जनाची धूम असतानाच अत्यंत दुर्दैवी घटना घडली. विसर्जनावेळी भक्तांवर काळाने झडप घातली आहे. अकोल्यातील कापशी येथून गणेश विसर्जन करून घरी परतणाऱ्या भक्तांच्या दुचाकीचा भीषण अपघात झाला. दुचाकीला कारची जोरदार धडक लागली. यामध्ये अवघ्या ३० वर्षीय रामचंद्र आंधळे याचा मृत्यू झाला आहे. उड्डाण पुलाजवळील सर्व्हिस रस्त्याचा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे, त्यामुळेच अशा जीवघेण्या घटना घडत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. भक्तिभावाने 10 दिवस गणपती बाप्पांची पूजा अर्चा केल्यानंतर आज निरोप द्यायचा दिवस होता. मात्र नियतिने वेगळाच डाव मांडला होता. रामचंद्रच्या जाण्याने परिसरात शोककळा पसरली आहे.

