• Sun. Jun 7th, 2026

    इंजिनियरकडून अल्पवयीन मुलीस लग्नाचं आमिष, शारिरीक संबंध अन्…, रायगडामधील धक्कादायक घटना

    इंजिनियरकडून अल्पवयीन मुलीस लग्नाचं आमिष, शारिरीक संबंध अन्…, रायगडामधील धक्कादायक घटना

    रायगड जिल्ह्यात काही दिवसांपूर्वीच मुलीला लग्नाचं आमिष देत अत्याचार केल्याच्या अनेक घटना समोर आल्या असताना आता इंजिनियर तरूणाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केले. तिची प्रसुती झाली असल्याची धक्कादायक समोर येत आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अमुलकुमार जैन, रायगड : लग्नाचे आमिष दाखवून काही दिवसापूर्वी रायगड जिल्ह्यात चार घटना झाल्या असून यामध्ये तर एका अभियंता याने महिलेला देखील लग्नाच्या आमिष दाखवल्याची घटना उघडकीस आली होती. असाच एक प्रकार रायगड जिल्ह्यातील पोयनाड पोलिस ठाणे हद्दीत उघडकीस आला असून याचा तपास पोयनाड पोलिसांकडून सुरू असल्याची माहिती पोयनाड पोलिसांनी दिली आहे.

    याबाबत सविस्तर वृत्त असे की, अल्पवयीन पीडिता ही 16 वर्षे तीन महिन्याची असून ती कामानिमित पनवेल तालुक्यात राहत आहे. अल्पवयीन पीडिता ही आणि आरोपी (वय-२० रा. चिचवली आदीवासीपाडी पो. नारंगी ता. अलिबाग जि. रायगड) हे दोघेही एकमेकाचे नातेवाईक आहेत. आरोपीने मे २०२४ ते २२ऑगस्ट २०२५ दरम्यान पीडिता ही अल्पवयीन आहे हे माहीत असून देखील तिला विवाहाचे आमिष दाखवले. पुढे पीडितेला स्वतःच्या घरी बोलवून तिच्या सोबत वारंवार शारीरिक संबंध प्रथापित केले. त्यामुळे सदर अल्पवयीन पीडिता ही नऊ महिन्याची गर्भवती राहून तिची अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात प्रसूती झाली. याबाबत पोयनाड पोलिस ठाण्यात गू.रजि.नं.८४/२०२५ भा.न्या.सं २०२३ चे कलम ६४. (२) (म) ६५(१), सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ४,५(ज) (२) ५(ল),६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षकए.जी.मरस्कोले हे करीत आहेत.

    अलीकडेच पेण तालुक्यात अशी घटना समोर आली होती. एका 22 वर्षीय तरूणाने अल्पवयीन मुलीशी जबरदस्तीने संबंध प्रस्थापित करत तिला 4 महिन्याचे गरोदर ठेवले होते. रायगड जिल्ह्यात महिन्याला अल्पवयीन मुलींवर जबरदस्ती करीत त्यांना गर्भवती ठेवण्याचे प्रकार हे जवळपास दहाच्या आसपास गुन्हे है जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात दाखल होत असतात. अल्पवयीन पीडिता ह्या महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांच्या रायगड जिल्ह्यात सुरक्षित नाहीतर इतर जिल्ह्यात त्यांची काय परिस्थिती असेल असा प्रश्न सामान्यांकडून विचारण्यात येत आहे.

    नारायण परब

    लेखकाबद्दलनारायण परब नारायण परब,महाराष्ट्र टाइम्स मध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे. २०१७ पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले आहे. नवराष्ट्रसाठी कंटेन्ट रायटर म्हणून काम केले असून विविध इंस्टाग्राम पेजसाठी ही कंटेन्टची निर्मिती केली आहे. जनसंपर्क क्षेत्रातही फ्रिलान्सर म्हणून काम करण्याचा अनुभव. ऑल इंडिया रेडिओसाठीही काम केले आहे . क्रीडा, राजकारण, देश-विदेश, मनोरंजन, करिअर, ऑटो या कार्यक्षेत्रांमध्ये विशेष रस. साठये महाविद्यालयातील माध्यम विभागात २०१७ पासून व्याख्याता म्हणून कार्यरत.… आणखी वाचा