• Wed. Mar 11th, 2026
    Jalna Accident: नियंत्रण सुटलं आणि कार थेट विहिरीत जाऊन कोसळली, पाच जणांचा मृत्यू, जालन्यात भीषण अपघात

    Jalna Car Fell In Well: जालन्यात भीषण अपघात घडला असून त्यात पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. एक कारचं नियंत्रण सुटलं आणि ती थेट विहिरीत जाऊन कोसळली. या अपघाताने परिसरात एकच खळबळ माजली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    जालना: जालना येथे एक मोठा अपघात घडला आहे. टेंभूर्णी-राजूर रोडवरील शिवार परिसरात एका कारचे अचानक नियंत्रण सुटले आणि ती कार विहिरीत जाऊन पडली. या भीषण अपघातात कारमधील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. ही कार एका रुग्णाला उपचारासाठी सुलतानपूरला घेऊन जात होती आणि याच दरम्यान हा अपघात झाल्याची माहिती आहे.

    गाडीतील पाच जणांचा मृत्यू

    जाफराबाद तालुक्यातील टेंभूर्णी-राजूर रोडवरील गाडेगव्हान फाट्याजवळ हा भयंकर अपघात घडला. ह्युंदाई कंपनीची आय 20 गाडी फुलंब्री तालुक्यातील गुंगी गेवराई येथून ज्ञानेश्वर भाऊसाहेब डकले, निर्मला सोपान डकले (रा.गुंगी गेवराई),पद्माबाई लक्ष्मण भामीरे, ज्ञानेश्वर लक्ष्मण भामीरे (रा. कोपर्डा ता. भोकरदन) आणि चालक असे पाच जण नातेवाईकासोबत पॅरलेसिस उपचार घेण्यासाठी मेहकर तालुक्यातील सुलतानपूर जाण्यासाठी निघालेले होते.
    Maharashtra TimesCrime Diary: विवाहित लेक बॉयफ्रेंडसोबत नको त्या अवस्थेत, सासरच्यांकडून वडिलांचा अपमान; आधी दोघांची धिंड काढली, मग संपवलं
    प्रत्यक्षदर्शींच्या मते, ही घटना सकाळी पाचच्या सुमारास घडल्याची माहिती आहे. चालकाने मॉर्निंग वॉक करणाऱ्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात येत आहे, त्यादरम्यान कार अनियंत्रित झाली आणि थेट विहिरीत जाऊन पडली. अपघातानंतर तिथे उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी आरडाओरडा केला आणि जवळच्या लोकांना जमा केलं. तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिस आणि स्थानिक प्रशासन घटनास्थळी पोहोचले आणि बचाव कार्य सुरू केले. घटनास्थळी सकाळीच पोलिस प्रशासनाने धाव घेतली. मात्र विहिरीची खोली जवळपास 70 फूट असून पाणीपातळी 60 फुटापर्यंत असल्याने अग्निशमन दल आणि एनडीआरएफ टीम बोलावण्यात आली असून शर्थीचे प्रयत्न सुरू होते. बचाव कार्यात गाडीतील पाच जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

    य अपघातात सकाळी व्यायाम करण्याच्या उद्देशाने जाफराबाद तालुक्यातील टेंभूर्णी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गडेगव्हाण येथील माजी सरपंच भगवान बनकर आणि त्यांचे सहकारी रोडवर फिरत असताना या गाडीने जोराची धडक दिल्याने ते देखील गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी जालना येथील कलावती हॉस्पिटल दाखल असल्याचे कळाले आहे.

    नुपूर उप्पल

    लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर विकास उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत.गेल्या तीन वर्षांपासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहे. राष्ट्रीय, गुन्हेगारी, राजकीय, हटके स्टोरीज या विषयांचं लिखाण करण्यात हातखंडा आहे. घटनेचं विश्लेषणात्मक लिखाण करण्यात रस. गेल्या 9 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत असून यापूर्वी टीव्ही ९ मराठी, साममध्ये कामाचा अनुभव आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून बॅचलर ऑफ मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझमचं शिक्षण घेतलं आहे.… आणखी वाचा