Dharashiv News: धाराशिवमध्ये मुसळधार पावसामुळे विश्वरूप नदीला पूर आला असून ‘हॉटेल तिरंगा’मध्ये पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले. यामुळे हॉटेल मालक लक्ष्मण भोसले यांना मोठा धक्का बसला. त्यानंतर भाग्यश्री हॉटेलचे मालक नागेश मडके यांनी भोसले यांना धीर दिला.
धाराशिवमध्ये दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचलं असून विश्वरूप नदीला पूर आला आहे. या पुरामुळे सोशल मीडियावर लोकप्रिय झालेल्या ‘हॉटेल तिरंगा’ मध्ये पाणी शिरल्याची घटना घडली. गुडघाभर पाणी शिरल्याने हॉटेलमधील साहित्याचे मोठे नुकसान झाले. अचानक झालेल्या या दुर्घटनेमुळे हॉटेलचे मालक लक्ष्मण भोसले यांना मोठा धक्का बसला.
Dharashiv Crime : बाईकवरुन जाताना नवरा-बायकोला धडक, कारमधून उतरुन दोघांवर वार; भररस्त्यात पती-पत्नीला संपवलं
लोकांकडून मिळत असलेला पाठिंबा हा धीर देणारा!
या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यातील भाग्यश्री हॉटेलचे मालक नागेश मडके यांनी तिरंगा हॉटेलच्या मालकाला भेटून त्यांना धीर दिला. “खचून जाऊ नका, धाराशीव जिल्हा तुमच्यासोबत आहे. शासनाने योग्य ती नुकसानभरपाई द्यावी,” अशी मागणी त्यांनी केली. तिरंगा हॉटेलला सोशल मीडियामुळे विशेष प्रसिद्धी मिळाली आहे. त्यामुळे या घटनेचे व्हिडिओदेखील मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले आहेत. नुकसानीमुळे व्यावसायिक क्षेत्रातील अडचणी वाढल्या असल्या तरी समाजातील लोकांकडून मिळत असलेला पाठिंबा हा धीर देणारा ठरत आहे.
व्यवसाय उभा करणं ही कठीण गोष्ट आहे – भोसले
लक्ष्मण भोसले यांनी या प्रसंगी प्रतिक्रिया देताना सांगितलं की, “व्यवसाय उभा करणं ही कठीण गोष्ट आहे. संकटात कोणीही एकमेकांना सोडू नये. लोकांनी आधार द्यावा, एवढीच अपेक्षा आहे,” असं भोसले यांनी म्हटलं आहे.

