• Sat. Mar 14th, 2026

    ‘हॉटेल तिरंगा’ला पुराचा तडाखा; धीर देण्यासाठी भाग्यश्री हॉटेलचा मालक धावला, सरकारकडे केली महत्त्वाची मागणी

    ‘हॉटेल तिरंगा’ला पुराचा तडाखा; धीर देण्यासाठी भाग्यश्री हॉटेलचा मालक धावला, सरकारकडे केली महत्त्वाची मागणी

    Dharashiv News: धाराशिवमध्ये मुसळधार पावसामुळे विश्वरूप नदीला पूर आला असून ‘हॉटेल तिरंगा’मध्ये पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले. यामुळे हॉटेल मालक लक्ष्मण भोसले यांना मोठा धक्का बसला. त्यानंतर भाग्यश्री हॉटेलचे मालक नागेश मडके यांनी भोसले यांना धीर दिला.

    ‘हॉटेल तिरंगा’ला पुराचा तडाखा; धीर देण्यासाठी भाग्यश्री हॉटेलचे मालक धावले(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    धाराशिव: मागील काही महिन्यांपासून इस्टाग्रामवर चर्चेत आलेले हॉटेल तिरंगाच्या मालकाला गेल्या दोन दिवसांपासून धाराशिव जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पुराच्या पाण्याचा तडाखा बसला आहे. विश्वरूप नदीची पाणी पातळी वाढल्याने हॉटेलमध्ये गुडघाभर पाणी शिरले आणि मोठ्या प्रमाणावर साहित्याचंही नुकसान झालं.

    धाराशिवमध्ये दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचलं असून विश्वरूप नदीला पूर आला आहे. या पुरामुळे सोशल मीडियावर लोकप्रिय झालेल्या ‘हॉटेल तिरंगा’ मध्ये पाणी शिरल्याची घटना घडली. गुडघाभर पाणी शिरल्याने हॉटेलमधील साहित्याचे मोठे नुकसान झाले. अचानक झालेल्या या दुर्घटनेमुळे हॉटेलचे मालक लक्ष्मण भोसले यांना मोठा धक्का बसला.

    Maharashtra TimesDharashiv Crime : बाईकवरुन जाताना नवरा-बायकोला धडक, कारमधून उतरुन दोघांवर वार; भररस्त्यात पती-पत्नीला संपवलं

    लोकांकडून मिळत असलेला पाठिंबा हा धीर देणारा!

    या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यातील भाग्यश्री हॉटेलचे मालक नागेश मडके यांनी तिरंगा हॉटेलच्या मालकाला भेटून त्यांना धीर दिला. “खचून जाऊ नका, धाराशीव जिल्हा तुमच्यासोबत आहे. शासनाने योग्य ती नुकसानभरपाई द्यावी,” अशी मागणी त्यांनी केली. तिरंगा हॉटेलला सोशल मीडियामुळे विशेष प्रसिद्धी मिळाली आहे. त्यामुळे या घटनेचे व्हिडिओदेखील मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले आहेत. नुकसानीमुळे व्यावसायिक क्षेत्रातील अडचणी वाढल्या असल्या तरी समाजातील लोकांकडून मिळत असलेला पाठिंबा हा धीर देणारा ठरत आहे.

    व्यवसाय उभा करणं ही कठीण गोष्ट आहे – भोसले

    लक्ष्मण भोसले यांनी या प्रसंगी प्रतिक्रिया देताना सांगितलं की, “व्यवसाय उभा करणं ही कठीण गोष्ट आहे. संकटात कोणीही एकमेकांना सोडू नये. लोकांनी आधार द्यावा, एवढीच अपेक्षा आहे,” असं भोसले यांनी म्हटलं आहे.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे | २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधण्याचेही काम करत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी लोकमत, न्यूज १८ लोकमत आणि एबीपी माझा या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून मुंबईतील रूईया महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा