महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
पुण्यात राहुल गांधी यांच्या जीवाला धोका असल्याची माहिती त्यांच्या वकिलांनी न्यायालयात दिली होती. मात्र, राहुल गांधी यांच्या परवानगीशिवाय न्यायालयात अर्ज दाखल केल्याने आता हा अर्ज मागे घेण्यात येणार आहे. अर्जातील मजकुराबाबत राहुल गांधी यांनी असहमती दर्शवल्यामुळे वकिलांनी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
राहुल गांधी यांच्या जीवाला धोका असल्याचं त्यांच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितलं होतं. त्यासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. पण हा अर्ज राहुल गांधी यांच्याशी सल्लामसलत न करता केला गेला होता. त्यामुळे आज दाखल करण्यात आलेला अर्ज उद्या मागे घेणार असल्याची माहिती गांधी यांचे वकील मिलिंद पवार यांनी दिली. आज दाखल केलेल्या अर्जाला माझे अशील राहुल गांधी यांनी तीव्र विरोध केला आहे. त्यांनी अर्जातील मजकुराबद्दल असहमती व्यक्त केलेली आहे. त्यामुळे अर्ज मागे घेणार असल्याचं पवार यांच्याकडून सांगण्यात आलं आहे.
