• Wed. Sep 9th, 2026
समृद्धी महामार्गाच्या जमिनीच्या मूल्यांकनावरून शेतकऱ्यांचा संताप; जिल्हाधिकारी बैठकीतून उठून गेले!


समृद्धी महामार्गाला जोडणारा जालना-नांदेड महामार्ग काही वर्षांपूर्वी मंजूर करण्यात आला. या महामार्गाला लागणाऱ्या जमिनीची मोजणी देखील झाली. पण मोबदला मात्र देताना सरकार हात आखडता घेत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकरी मात्र संतप् झाले आहे. शेतकऱ्यांना जमिनीचा चांगला मोबदला पाहिजे. पण सरकार मात्र त्यामध्ये प्रचंड कपात करत आहे, त्यामुळे चिडलेल्या शेतकऱ्यांनी…आज जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन चर्चा केली. पण यावेळी प्रचंड गोंधळ झाला. शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल भावाने घेता हे चालणार नसल्याचे शेतकऱ्यांनी…जिल्हाधिकाऱ्यांना ठणकावून सांगितले. शेतकऱ्यांनी चांगलेच खडे बोल सुनावले. हे सगळच पाहता समोर बसलेल्या जिल्हाधिकाऱ्यांनी देखील काढता पाय घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed