Youth Lost His Leg After Falling From Train: आंबिवली आणि शहाड रेल्वे स्थानका दरम्यान अतिशय धक्कादायक प्रकार घडला आहे. मेल एक्सप्रेसच्या दारावर उभा असलेल्या प्रवाशाचा फटका मारून मोबाईल हिसकावला. प्रवासी खाली पडल्याने त्याच्या दोन्ही पायाला गंभीर दुखापत होऊन त्याला आपला पाय गमावावा लागल्याची माहिती आहे.
अल्पवयीन चोरट्याला अटक
या दरम्यान, पोलिसांनी या चोरट्याची ओळख पटवून त्याला ताब्यात घेत त्याच्याकडून तरुणाचा चोरलेला मोबाईल जप्त केला आहे. हा चोरटा अल्पवयीन इराणी असल्याची माहिती कल्याण रेल्वे पोलिसांनी दिली.गौरव निकम (२६) हा तरुण नाशिक ते ठाणे दरम्यान तपोवन एक्सप्रेसने प्रवास करत होता. रविवारी (ता.३ ऑगस्ट) रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास गाडी शहाड आणि आंबिवली दरम्यान धावत असताना दरवाजात असलेल्या गौरवच्या हातावर अचानक काठीचा जोरदार फटका बसला.या हल्ल्यात बेसावध असलेला गौरव गाडीतून बाहेर फेकला गेला.
Jharkhand News: अनेकवेळा बेल वाजवूनही प्रतिसाद नाही, दार उघडताच समोर भयंकर दृश्य, आईसह दोन मुलांनी आयुष्य संपवलं
डावा पाय रेल्वेच्या चाकाखाली गेल्याने गमावला पाय
या दुर्घटनेत त्याचा डावा पाय गाडीच्या चाकाखाली आल्याने त्याने पाय गमावला असून उजव्या पायाला देखील दुखापत झाली आहे. दरम्यान वेदनेने गौरव विव्हळत असताना फटका मारणाऱ्या चोरट्याने त्याला लाथा बुक्क्यांनी मारहाण करत त्याच्याकडील २० हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरून त्याला त्याच अवस्थेत सोडून पळ काढला.
दरम्यान, कल्याण रेल्वे पोलिसांना या बाबत माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत या तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. या तरुणाने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी ओळख पटवून १६ वर्षीय अल्पवयीन चोरट्याला इराणी वस्तीतून ताब्यात घेतले असून त्याच्याकडून चोरलेला मोबाईल जप्त केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ कांदे यांनी दिली. मात्र या घटनेमुळे रेल्वे प्रवाशाची सुरक्षा आणि फटका गंगची दहशतीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

