App Based-Taxi Service: केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांनी सहकार टॅक्सी धोरणाची घोषणा केली. यामुळे केंद्राकडून सहकारी तत्त्वावर टॅक्सी उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेण्यात येत आहे.
या सेवेसाठी रिक्षा, टॅक्सी खरेदी करण्याकरीता मराठी बेरोजगार तरुणांना मुंबई बँकेच्या माध्यमातून ९० टक्क्यांपर्यंत अर्थसहाय्य करत स्वयंरोजगार देण्याचा महायुती सरकारचा मानस आहे. महामुंबईत हा प्रयोग यशस्वी ठरल्यास राज्यात सरकारी अॅप आधारित प्रवासी वाहतूक सुरू करण्यात येणार आहे. ‘खासगी कंपन्या ॲपद्वारे प्रवासी वाहतूक करून मोठा नफा मिळवतात. राज्य सरकारकडे तंत्रज्ञान, मनुष्यबळ व सर्वसामान्यांचा विश्वास आहे. यामुळे ॲप आधारित रिक्षा, टॅक्सी सेवा सुरू करणार आहोत. यासाठी तरुणांना मुंबै बँकेच्या मदतीने कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे’, असे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
शहापूर हादरलं! आईला लेकी झाल्या नकोश्या, जेवायला दिलं अन्…, तीन सख्ख्या बहिणींसोबत काय घडलं?
राज्य सरकारकडून चार महामंडळांच्या माध्यमातून बेरोजगारांना व्याजाचा परतावा देण्यात येतो. यात अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ, भटके विमुक्त महामंडळ, ओबीसी महामंडळ आणि एमटीडीसी या चार महामंडळांकडून १२ टक्क्यांपर्यंत व्याज परतावा केला जातो. या सर्वांची जोडणी करत राज्याचा परिवहन विभाग, मुंबई बँक आणि महामंडळ असा त्रिपक्षीय सामंजस्य करार करण्यात येत आहे. तरुणांना देण्यात येणाऱ्या कर्जाच्या व्याजाबाबत करार झाल्यानंतर अधिक स्पष्टता येईल. येत्या महिनाभरात हा करार पूर्णत्वास येणार आहे’, असे मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी सांगितले.
Ganeshotsav 2025: एका खड्ड्यामागे 15 हजार दंडाचा निर्णय जाचक, गणेशोत्सव मंडळांची सरकार दरबारी धाव
‘रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने केंद्रीय मोटार वाहन ॲग्रिगेटर मार्गदर्शक तत्त्वे २०२५ जाहीर केली आहेत. राज्य सरकारने ॲग्रिगेटर धोरणाचा निर्णय जाहीर केला आहे. राज्यात ॲप आधारित रिक्षा, टॅक्सी, बससाठीची नियमावली न्याय व विधी विभागाकडे पाठवण्यात आली आहे. लवकरच यावर हरकती आणि सूचना मागवण्यात येतील. त्यानंतर बदल करून महिनाभरात नियमावली जाहीर करण्यात येणार आहे, असे परिवहन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
Mumbai News: मुंबईसाठी नवा ‘गोडे पाणी’ प्रकल्प; वर्सोवात निःक्षारीकरण प्रकल्पाची होणार उभारणी
परिवहन विभागाकडून अॅप विकसित करण्यासाठी ‘मित्र’सह अन्य खासगी कंपन्यांशी अॅप निर्मितीसाठी बोलणी सुरू आहेत. सरकारला अपेक्षित बाबी त्यांना कळवल्या आहेत. महिनाभरात अॅप तयार होऊन योजना सुरू करण्याचे नियोजन असून मराठी तरुणांच्या रोजगारासाठी ही योजना असल्याने ‘जय महाराष्ट्र’ या नावाने अॅप सुरू केले जाणार आहे. –प्रताप सरनाईक, परिवहनमंत्री

