राज्याचे नोंदणी महानिरीक्षक रवींद्र बिनवडे यांच्या वर्तनामुळे नागरिक त्रस्त असल्याचा आरोप करण्यात आला आहे. स्वाभिमानी ब्रिगेड संघटनेच्या कार्यकर्त्यांना त्यांनी अपमानास्पद वागणूक दिली. त्यांचे प्रश्न न ऐकता त्यांना कार्यालयातून हाकलून देण्यात आले. या घटनेमुळे त्यांच्यामध्ये संतापाची लाट पसरली आहे. त्यामुळे स्वाभिमानी ब्रिगेड संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री आणि महसूल मंत्र्यांकडे तक्रार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
अधिकाऱ्याचा टोकाचा उद्धटपणा, नागरिकांना शिवीगाळ, ‘बाहेर निघा’ असा दम; नोंदी महानिरीक्षक रवींद्र बिनवडे यांच्यावर गंभीर आरोप
