• Sun. Mar 15th, 2026

    मंत्रालयाकडे पायी निघालेल्या शेतकऱ्याची प्रकृती बिघडली; खांद्यावर नांगर घेऊन 12 दिवसांपासून पदयात्रा, काय आहे मागणी?

    मंत्रालयाकडे पायी निघालेल्या शेतकऱ्याची प्रकृती बिघडली; खांद्यावर नांगर घेऊन 12 दिवसांपासून पदयात्रा, काय आहे मागणी?

    Latur Farmer Protest: लातूरच्या अहमदपूर येथील शेतकरी सहदेव होनाळे हे खांद्यावर नांगर घेऊन पायी चालत मंत्रालयाच्या दिशेने निघाले आहेत. मात्र, ठाण्यात दाखल होताच त्यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना तात्काळ ठाणे सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

    latur farmer hospital (फोटो– महाराष्ट्र टाइम्स)

    म. टा. प्रतिनिधी, ठाणे: शेतमालाला हमीभाव मिळावा तसेच कर्जमाफी करावी, या मागणीसाठी लातूरच्या अहमदपूर येथील शेतकरी सहदेव होनाळे हे खांद्यावर नांगर घेऊन पायी चालत मंत्रालयाच्या दिशेने निघाले आहेत. मात्र, ठाण्यात दाखल होताच त्यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना तात्काळ ठाणे सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

    या पदयात्रेदरम्यान प्रकृती अत्यवस्थ झाल्याने होनाळे रुग्णालयात असताना राष्ट्रवादी काँग्रेस (शप) विधिमंडळ गटनेते जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्याशी व्हिडीओ कॉलद्वारे संवाद साधत दिलासा दिला.

    शेतकऱ्यांचा सात बारा महायुती सरकारने कोरा करावा. तसेच शेतकरी आत्महत्या करीत आहेत. या आत्महत्या रोखाव्यात, या मागणीसाठी शेतकरी सहदेव होनाळे हे खांद्यावर नांगर घेऊन मंत्रालयाच्या दिशेने पायी चालत निघाले आहेत. दोन दिवसांपूर्वी होनाळे हे भिवंडीत थांबले होते. त्यावेळीच त्यांच्या पायाला अक्षरशः फोड आले होते. अखेर सोमवारी ठाण्यात दाखल झालेल्या होनाळे यांची प्रकृती चिंताजनक झाली. ही माहिती मिळताच जितेंद्र आव्हाड यांनी जिल्हाध्यक्ष सुहास देसाई आणि कार्याध्यक्ष प्रकाश पाटील यांना होनाळे यांची भेट घेण्याची सुचना केली होती.
    डोक्यात हवा जाऊ न देता वागा; वादग्रस्त मंत्री, आमदारांना एकनाथ शिंदेंकडून कानपिचक्या, काय म्हणाले?
    त्यानुसार, त्यांनी होनाळे यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. आव्हाड यांनी व्हिडीओ कॉलवर होनाळे यांची कैफियत ऐकून घेतली. हा विषय विधिमंडळात मांडण्याचे आश्वासन दिले. मंगळवारी होनाळे पुन्हा मंत्रालयाच्या दिशेने निघणार आहेत. आमचा त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा आहे. या सरकारला आता बळीराजा त्यांची जागा दाखवेल, असे सुहास देसाई यांनी नमूद केले.
    Raj Thackeray: थंड वातावरणात राजकारण तापणार? मनसेच्या 3 दिवसीय राज्यस्तरीय शिबिराला इगतपुरीत सुरुवात
    आवाज सरकारपर्यंत पोहोचावा
    शेतकऱ्यांच्या समस्यांनी सहदेव होनाळे यांना याप्रसंगी अश्रू अनावर झाले. आव्हाड यांनी कैफियत जाणून घेतली. हा आवाज आता सरकारपर्यंत पोहचावा, अशीही विनंती होनाळे यांनी पत्रकारांशी बोलताना केली

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा