Sanjay Gaikwad Controversial Statement : शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी त्रिभाषा धोरणावर बोलताना छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले. या विधानामुळे त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी गायकवाड यांच्यावर सडकून टीका केली. ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनीही गायकवाड यांच्या वक्तव्यावर टीका केली. मुर्ख म्हणणारेच मुर्ख आहेत, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या आहेत.
“15 वर्षांपू्र्वी एकत्र आले असते तर काहीतरी परिणाम झाला असता. राज साहेबांनी टाळीला टाळी द्यायला खूप उशिर केला आहे. मला नाही वाटत याचा फार फरक महाराष्ट्रावर पडेल. आता तुम्ही किती लोकांशी संपर्क करता, किती लोकांची कामं करता यावर अवलंबून आहे. असा ठाकरे नावाचा ब्रँड असता तर बाळासाहेब ठाकरे जिवंत असतानाच 288 जागा जिंकून आल्या असत्या. तेव्हाही 70 ते 74 जागांच्या पुढे गेलो नाहीत”, असा देखील दावा संजय गायकवाड यांनी केला.
“संजय गायकवाड यांच्या या वक्तव्यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी टीका केली. त्या गायकवाडचा जन्मच ठाकरे ब्रँडमधून झाला. काही लोकांना कोणी विचारतही नव्हतं, असा टोला विजय वडेट्टीवार यांनी लगावला. छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन मा जिजाऊंचा नाव घेऊन भाषेच्या आधारावर त्यांना मुर्ख होते का म्हणणं म्हणजे यांच्या अकलेचे दिवाळ निघाले आहे. अशी माणसं सत्तेत तयार झाली. सातत्याने महापुरुषांचं नाव घेऊन त्यांचा अवमान करण्याची अवलाद जास्त व्हायला लागली. ही अवलाद सत्ताधाऱ्यांना बुडवणार आहे”, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली.
बाळा नांदगावकर काय म्हणाले?
“छत्रपती संभाजी महाराजांचा आदर्श आहेच, ते आमचे छत्रपतीच होते. पण शिवाजी महाराजांनी राजकोष सुद्धा मराठी भाषेत लिहिला होता. हे ते विसरलेत का? परकीय आक्रमण होतं ते प्रथम भूमीवर होतं. त्यानंतर भाषेवर आक्रमण होतं. त्या काळात 16 भाषा अवगत करणं हे सुद्धा किती महत्त्वाचं होतं. ते छत्रपती संभाजी महाराजांनी केलं होतं. त्यांनी भाषा अवगत केल्या होत्या. आम्हाला अभिमानच आहे”, असं बाळा नांदगावकर म्हणाले.
Sanjay Gaikwad | ज्याला महाराष्ट्रात मराठी बोलण्याची लाज वाटते म्हणतो त्यांचे थोबाड फोडलं पाहिजे
‘हेच मुर्ख आहेत’
ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनीदेखील संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. “मुर्ख म्हणणे चूक आहे. हेच मुर्ख आहेत. ज्यांनी भाषा शिकले ते थोडसं मोठे झाल्यानंतर शिकले. इंग्रजी भाषा ही व्यापारी भाषा आहे. आम्ही कुठल्याही भाषेचा अनादर केला नाही. पण सक्ती करायची नाही”, असं किशोरी पेडणेकर म्हणाले.

