Uddhav Thackeray Speech At Vijay Melava : माझ्या आणि राजमधला अंतरपाट अनाजीपंतांनी दूर केला, एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी; उद्धव ठाकरेंनी ठणकावलं
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
आम्हा दोघांमधला अंतरपाट अनाजीपंतांनी दूर केला. एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी. आज भोंदूबाबा-महाराज व्यस्त असतील, कोणी टाचण्या टोचतंय, कोणी अंगारे धुपारे करतंय, कोणी रेडे कापतंय, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. या नतद्रष्टांचा अनुभव घेतला, वापरायचं आणि फेकून द्यायचं. आता आम्ही दोघं मिळून तुम्हाला फेकून देणार आहोत, असा इशाराही उद्धव ठाकरेंनी दिला. डोक्यावर बाळासाहेबांचं छत्र नसतं तर काय केलं असतं? कोणत्या भाषेत बोलत होतात? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी विचारला.
Raj Thackeray : ‘आम्हाला एकत्र आणणं बाळासाहेबांना नाही, पण देवेंद्र फडणवीसांना जमलं’; राज ठाकरे काय म्हणाले?
राजने सगळ्यांची शाळा काढली, मला एक प्रश्न पडला आहे, नरेंद्र मोदी यांची शाळा कोणती? सगळ्यात उच्चशिक्षित आहेत. भाजप ही अफवांची फॅक्टरी आहे. मधल्या काळात यांनी सुरु केलं होतं, की उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं, पण हिंदुत्व ही कुठल्याही भाषेची मक्तेदारी नाही. आम्ही अस्सल मराठी बोलणारे तुमच्याहीपेक्षा जास्त कडवट, कट्टर देशाभिमानी हिंदू आहोत. तुम्ही काय आम्हाला हिंदुत्व शिकवणार? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी विचारला.
राज आणि उद्धव ठाकरेंना सोबत पाहण्यासाठी शिवसैनिक आणि मनसैनिकांची गर्दी
Uddhav Raj Victory Rally : वरळी डोम हाऊसफुल्ल, कार्यकर्त्यांची रेटारेटी, ठाकरे बंधूंना पाहण्यासाठी समर्थकांचा गेट तोडून प्रवेश
हिंदीसक्तीच्या विरोधातील निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारने मागे घेतल्यानंतर मनसे आणि ठाकरेसेना यांच्याकडून वरळीत विजयी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. वरळी डोम परिसरात मनसे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची तुफान गर्दी झाली आहे. या सोहळ्याला रश्मी ठाकरे, तेजस ठाकरे, आदित्य ठाकरे, अमित ठाकरे, शर्मिला ठाकरे असे कुटुंबीय उपस्थित आहेत. याशिवाय संजय राऊत, सुभाष देसाई, अनिल देसाई, प्रियांका चतुर्वेदी, किशोरी पेडणेकर, संदीप देशपांडे, अविनाश जाधव

