• Mon. Jun 8th, 2026
    शिक्षण घेण्यासाठी चिमुकल्यांची धडपड; पण शाळेत जाण्यासाठी करावी लागतेय जीवघेणी कसरत

    Childrens Deadly Journey To School : रस्ता नसल्याने 20 विद्यार्थ्यांना नदी पार करावी लागते. नदीवर पूल नसल्यामुळे झाडांच्या फांद्या पकडून विद्यार्थी जीव मुठीत घेऊन प्रवास करतात. पावसाळ्यात पूर आल्यास विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबते.

    (फोटो– Lipi)

    महेश पाटील, नंदुरबार : आधुनिकतेकडे, विकासाकडे वेगाने वाटचाल करणाऱ्या महाराष्ट्रातील काही गाव-खेडी अजूनही विकासापासून दूर आहेत. एकीकडे आपण महाराष्ट्राच्या नवनिर्मितीचे गोडवे गातो. राज्यात या ना त्या कारणांवरुन आंदोलनं सुरू असल्याचं पाहतो. जाती वरुन राजकारण, भाषेवरुन राजकारण, नेत्या-नेत्यांमध्ये श्रेष्ठत्व आणि खुर्चीवरुन राजकारण होत असल्याचं आपण रोजच पाहतो. परंतु, खरंच ज्या विषयांसाठी लढण्याची आवश्यकता आहे अशा विषयांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जातं. आणि सामान्य जनतेला भलत्याच विषयांकडे भरकटवलं जातं.

    अक्कलकुवा तालुक्यातील केलखाडी पाड्यातील विद्यार्थ्यांचे शाळेत जाणे म्हणजे जीवघेणा प्रवास आहे. रस्ता नसल्याने 20 विद्यार्थ्यांना नदी पार करावी लागते. नदीवर पूल नसल्यामुळे झाडांच्या फांद्या पकडून विद्यार्थी जीव मुठीत घेऊन प्रवास करतात. पावसाळ्यात पूर आल्यास विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबते. या समस्येकडे शासन-प्रशासन कधी लक्ष देणार, असा सवाल गावकरी करत आहेत.
    Sanjay Raut : दोन भाऊ एकत्र येतायत तुमच्या पोटात कशाला दुखतंय? मोर्चा रद्द, पण जल्लोष होणारच- संजय राऊत
    अक्कलकुवा तालुक्यातील गंगापूर ग्रामपंचायतीमधील गुलीआंबा महसूल गावाच्या केलखाडी पाड्यात रस्त्याची सोय नाही. पाड्यात जायला रस्ता नाही. त्यामुळे येथील वीस विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या शाळेत जातात. शाळेत जाण्यासाठी त्यांना रोज नदी ओलांडावी लागते. नदीवर पूल नसल्याने, लहान मुले झाडांच्या फांद्या पकडून नदी पार करतात. या धोकादायक प्रवासात पाय घसरून पडण्याचा किंवा पाण्यात वाहून जाण्याचा धोका असतो. तरीही, शिक्षणाची ओढ असलेल्या या मुलांनी शाळा सोडलेली नाही. रस्ता नसल्यामुळे आजारी माणसांना दवाखान्यात ‘बांबुलन्सने’ न्यावे लागते.
    Sindhudurga News : भीषण अपघाताने सावंतवाडी हादरली, दोन एसटी बसेसची समोरासमोर जोरदार धडक, महाविद्यालयीन विद्यार्थी जखमी
    पावसाळ्यात नदीला पूर येतो. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबते. काही वेळा मुलांना नदीच्या काठावर थांबावे लागते किंवा ते शाळेत जाऊ शकत नाहीत. गावकऱ्यांनी रस्ता आणि पुलासाठी प्रशासनाकडे अनेकवेळा मागणी केली आहे. पण, अजून कोणताही निर्णय झालेला नाही. या मुलांचे शिक्षण सुरक्षित करणे खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे प्रशासनाने या समस्येकडे लक्ष देऊन रस्ता आणि पूल बांधावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

    या भागातील रस्ते इतके खराब आहेत की, लोकांना खूप त्रास सहन करावा लागतो. स्थानिक लोकांनी रस्ता आणि पुलासाठी प्रशासनाकडे खूप अर्ज केले आहेत. पण, अजून काहीही झालेले नाही. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये नाराजी आहे. मुलांच्या शिक्षणाचे नुकसान होऊ नये, यासाठी लवकरात लवकर उपाययोजना करण्याची गरज आहे. शाळेत हिंदी भाषेच्या विरोधातील आंदोलनाचे कौतुक होते. पण, जीव धोक्यात घालून शाळेत जाणाऱ्या या मुलांकडे कोणाचे लक्ष आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

    आशिष मोरे

    लेखकाबद्दलआशिष मोरेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि मानसशास्त्र बातम्यांमध्ये आवड. सायकॉलॉजी मध्ये विशेष अध्ययन.… आणखी वाचा