• Sat. Mar 7th, 2026

    शाळेच्या मधल्या सुट्टीत वाद, इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्याने दहावीतील विद्यार्थ्याला संपवलं, अहिल्यानगर हादरलं

    शाळेच्या मधल्या सुट्टीत वाद, इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्याने दहावीतील विद्यार्थ्याला संपवलं, अहिल्यानगर हादरलं

    Ahilyanagar News : अहिल्यानगरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. एका आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या केली. दोघांमध्ये आधी क्रिकेट खेळण्यावरून वाद झाला होता. त्यानंतर शाळेत जेवणाच्या सुट्टीत त्यांच्यात भांडण वाढले. यावेळी आठवीच्या विद्यार्थ्याने दहावीच्या विद्यार्थ्याला चाकू मारला. या हल्ल्यात दहावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी हल्ला करणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्याला ताब्यात घेतले आहे. या घटनेने शहरात खळबळ माजली आहे. तोफखाना पोलीस अधिक तपास करत आहेत.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अहिल्यानगर : काही घटना आपल्याला सुन्न करणाऱ्या असतात. त्या घटना पाहिल्यानंतर समाज म्हणून आपण कोणत्या दिशेला चाललोय? असा प्रश्न आपल्याला पडल्याशिवाय राहणार नाही. कारण घटनाच तशा घडताना दिसत आहेत. अहिल्यानगरमध्ये अवघ्या आठवी इयत्तेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने इयत्ता दहावीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याचा खून केला. आठवीच्या विद्यार्थ्याने चाकूने भोसकून दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या केली. या हत्येच्या घटनेमुळे अहिल्यानगर शहरात एकच खळबळ उडाली आहे. आठवीच्या मुलाकडे शाळेत चाकू कसा आला? असा प्रश्न आता उपस्थित होतोय.

    अहिल्यानगर शहरामध्ये शाळकरी विद्यार्थ्यानेच विद्यार्थ्याचा खून केल्याने खळबळ उडाली आहे. शहरातील मध्यवर्ती असलेल्या सीताराम सारडा विद्यालयातील ही घटना आहे. आठवीतील विद्यार्थ्याने दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा खून केला आहे. दोन्ही विद्यार्थी एकाच भागात राहणारे आहेत. क्रिकेट खेळाच्या करणावरून दोघांमध्ये भांडण झालं होतं. शाळेत जेवणाच्या सुट्टीमध्ये दोघांमध्ये पुन्हा भांडण सुरू झालं. यात आठवीतील विद्यार्थ्याने दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर चाकूने हल्ला केला.

    या हल्ल्यात दहावीतील विद्यार्थी गंभीर जखमी झाला. त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जात असतानाच त्याचा मृत्यू झाला आहे. दरम्यान पोलीस सिताराम सारडा विद्यालयात पोहोचले. त्यांनी घटनेची माहिती घेतली आणि हल्ला करणाऱ्या आठवीतील विद्यार्थ्याला देखील ताब्यात घेतलं आहे.

    अहिल्यानगर शहरातील सिताराम सारडा महाविद्यालयात दहावीमध्ये शिक्षण घेत असलेल्या 14 वर्षीय विद्यार्थ्यावरती आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने हल्ला केला. या हल्ल्यात दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांच्या कारवाईकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

    घटनेची माहिती मिळताच तोफखाना पोलीस ठाण्याचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. सध्या पंचनामा आणि तपासाची प्रक्रिया सुरू आहे. मृताला नगरच्या शासकीय रुग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेनंतर रुग्णालयात परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. सध्या गुन्हा नोंद करण्याचं काम तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये सुरू आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील हे सध्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजीटल कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. चेतन यांनी याआधी tv9 मराठी, News18 लोकमत, आपलं महानगर येथे काम केलं आहे.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed