Vijay Wadettiwar: जिल्ह्याला स्टील हब बनविण्याचे स्वप्न दाखविले जात आहे, पण प्रत्यक्षात येथील खनीज संपत्तीवर डोळा आहे, असे वडेट्टीवार म्हणाले.
वडेट्टीवार म्हणाले , जिल्ह्याला स्टील हब बनविण्याचे स्वप्न दाखविले जात आहे, पण प्रत्यक्षात येथील खनीज संपत्तीवर डोळा आहे, त्यासाठीच खाणपट्ट्यांचे खुले लिलाव न करता जिंदालसारख्या कंपनीला अल्प महसूलावर लोहखनिज देण्याचे षडयंत्र रचण्यात येत आहे. यातून सत्तेतील तीनही पक्षाला लाभ मिळणार असल्याचा आरोप त्यांनी केला. जेएसडब्लू कंपनीने गडचिरोलीत एक लाख कोटीची गुंतवणूक करण्याचे जाहीर केले. मात्र, त्यांना देण्यात आलेल्या खाणपट्ट्याची मुदत संपली आहे.
टीआरपीसाठी धडपड, आव असा आणताहेत, जणू ते स्वातंत्र्यवीरच; नीलम गोऱ्हेंची राऊतांवर टीका
त्यामुळे नव्याने खुल्या पद्धतीने लिलाव करून हा पट्टा जिंदालला द्यायला हवा. त्यामुळे सरकारी तिजोरीत प्रती टन २३०० रुपयांचे स्वामित्व शुल्क जमा होईल, असे ते म्हणाले. यावेळी खासदार डॉ. नामदेव किरसान, आमदार रामदास मसराम, काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, महिला जिल्हाध्यक्षा ॲड. कविता मोहरकर, माजी नगराध्यक्ष ॲड. राम मेश्राम, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मनोहर पोरेट , युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव ॲड. विश्वजित कोवासे उपस्थित होते.
मोठा दिलासा! भटके-विमुक्तांना आता राज्यात कुठेही मिळणार रेशन; जातप्रमाणपत्र, आधारसह १५ मागण्यांवर निर्णय
शेतकऱ्यांना प्रति हेक्टर एक कोटी द्या
देसाईगंज येथील प्रस्तावित एमआयडीसीत जेएसडब्लू कंपनी लोह प्रकल्पासाठी जवळपास २३०० हेक्टर जमीन खरेदी करणार आहे. ग्रामीण भागात ६ ते ७ लाख प्रति हेक्टर आणि शहरी भागात २५ ते २८ लाख प्रति हेक्टर मोबदला देण्यात येणार आहे. येथे मोठ्या प्रमाणात सुपीक जमीन आहे. शेतकऱ्यांना सरसकट एक कोटी प्रति हेक्टर आणि दोन एकर मागे एकास नोकरी द्यावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली, अन्यथा काँग्रेस गावागावात जाऊन याचा विरोध करणार, असा इशारा दिला.

