• Sat. Mar 7th, 2026

    महाराष्ट्रात २.१४ लाख बांगलादेशी रोहिंग्यांचा जन्म दाखल्यासाठी अर्ज, किरीट सोमय्यांचा दावा

    महाराष्ट्रात २.१४ लाख बांगलादेशी रोहिंग्यांचा जन्म दाखल्यासाठी अर्ज, किरीट सोमय्यांचा दावा

    Kirit Somaiya on Fake Birth Certificate to Bangladeshi : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी महाराष्ट्रात बनावट कागदपत्र दिलेल्या बांगलादेशींना खोटे जन्म दाखले दिल्याचा दावा केला आहे. त्यांनी याप्रकरणी एक पोस्ट लिहून याबाबत माहिती दिली आहे.

    महाराष्ट्रात २.१४ लाख बांगलादेशी रोहिंग्यांचा जन्म दाखल्यासाठी अर्ज, किरीट सोमय्यांचा मोठा दावा

    मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी बांगलादेशींना दिल्या जाणाऱ्या बनावट कागदपत्रांवरुन तोफ डागली आहे. महाराष्ट्रातील काही भागात बेकायदेशीर बांगलादेशी आणि रोहिंग्यांना बनावट जन्म दाखले दिले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. किरीट सोमय्या यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी अनेक आरोप केले आहेत.

    सोशल मीडिया पोस्टमध्ये काय लिहिलंय?

    किरीट सोमय्या त्यांनी लिहिलंय, बनावट कागदपत्रं सादर केलेल्या बांगलादेशी रोहिंग्या लोकांना अधिकाऱ्यांनी ३९७७ जन्म दाखले दिले होते. या घोटाळ्याअंतर्गत बनावट जन्म दाखले, रेशनकार्ड आणि शाळेची प्रमाणपत्रं दिली जात आहेत. गेल्या सहा महिन्यांत महाराष्ट्रात २.१४ लाख बांगलादेशी आणि रोहिंग्यांनी जन्म दाखल्यांसाठी अर्ज केले आहेत. ९७ टक्के अर्ज हे बांगलादेशी रोहिंग्या मुस्लिमांचे असून त्यांनी खोटे कागदपत्र दिल्याचं त्यांनी लिहिलं आहे.
    मुंबई ते उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूरला जोडणारा महामार्ग लवकरच; MMRDA चा मोठा निर्णय
    या परदेशी नागरिकांना एकूण १.१३ लाख जन्म दाखले संशयास्पद परिस्थितीत देण्यात आले आहेत, असाही आरोप त्यांनी केला आहे. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात सर्वाधिक अर्ज आले असून जिल्ह्यात एकूण ७ हजार ९५७ बनावट जन्म दाखले देण्यात आल्याचा दावा सोमय्या यांनी केला. तसंच बाहेरच्या या बांगलादेशी नागरिकांना बनावट प्रमाणपत्रं देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याची माहितीही त्यांनी दिली.
    मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात ड्रेस कोड लागू; ‘मंदिराचं पावित्र्य जपणारा पेहराव असावा,’ न्यासाकडून महत्त्वाचा निर्णय

    बेकायदेशीर बांगलादेशींवर कठोर कारवाई – योगेश कदम

    दरम्यान, महाराष्ट्रात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशी लोकांप्रती राज्य सरकार कठोर पावलं उचलत असल्याचा असा दावा गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी केला आहे. आमच्या सरकारचे धोरण बेकायदेशीरपणे देशात राहणाऱ्या बांगलादेशींसाठी झिरो टॉलरन्सचं असल्याचं ते म्हणाले.
    नाशिकमधील मालेगाव तहसीलमध्ये जन्म दाखले देताना महसूल विभागाच्या दोन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं. पण निलंबनाची कारणं स्पष्ट करण्यात आलेली नाहीत. मालेगावमधील अधिकाऱ्यांच्या निलंबनाबाबत गृह राज्यमंत्री योगेश कदम यांना प्रश्न विचारला असता त्यांनी, हा अत्यंत गंभीर विषय आहे, त्यामुळेच निलंबनाचा आदेश काढण्यात आला आहे, असं म्हटलं.

    करिश्मा भुर्के

    लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed