लातूरमध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आमदार रमेश कराड यांचे पुत्र ऋषिकेश कराड यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार-खासदारांच्या कुटुंबीयांना उमेदवारी न देण्याचे आदेश दिले होते. या आदेशाकडे दुर्लक्ष करत कराड यांच्या मुलाने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
ऋषिकेश होळीकर, लातूर : राज्यामध्ये एकूण 12 ठिकाणी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीस सुरुवात झाली आहे. यामध्ये अनेक दिग्गज नेते आणि त्यांचे कुटुंबीय आपले नशीब आजमावताना दिसत आहेत. खरंतर या निवडणुका कार्यकर्त्यांच्या मानल्या जातात. पण आता नेतेमंडळींच्या नातेवाईकांनाच संधी मिळत आहे. असाच काहीसा प्रकार लातूरमध्येही बघायला मिळतोय. लातूर ग्रामीणचे आमदार रमेश कराड यांचे सुपुत्र ऋषिकेश कराड यांनी पानगाव जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
आमदार रमेश कराड यांनी याआधी दोन वेळा विधानसभा निवडणुकीसाठी आपले नशीब आजमावले होते. मात्र दोन्ही वेळा त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. 2024 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये आमदार रमेश कराड हे लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्यानंतर भाजपची मोर्चेबांधणी करण्यास अधिक वेग आला आहे. मात्र या निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणताही आमदार आणि खासदार यांच्या कुटुंबातील व्यक्तींना उमेदवारी देण्यास नकार दिला होता. याला मात्र केराची टोपली रमेश कराड यांनी दाखवली आहे. त्यांनी आपल्या मुलालाच उमेदवारी देत त्याचा अर्ज दाखल करून घेतला आहे.
जिल्हाध्यक्षांची पत्रकार परिषदेत घोषणा, पण..
विशेष म्हणजे जिल्हाध्यक्ष बस्वराज पाटील यांची पत्रकार परिषदेमध्ये एकाही आमदार, खासदार यांच्या कुटुंबातील सदस्यांना पक्षाने उमेदवारी दिली नाही, असं म्हटलं. मात्र रेणापूर तालुक्यातील पानगाव जिल्हा परिषद गटासाठी आमदार रमेश कराड यांचे सुपुत्र ऋषिकेश कराड यांनी काल आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांची उमेदवारी वापस घेण्यासाठी मनधरणी करण्यात आली आहे. ते आता उमेदवारी अर्ज वापस घेतील का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आमदार पुत्राने उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजगी पाहायला मिळत आहे.
दरम्यान, आमदार रमेश कराड यांचे पुत्र ऋषिकेश कराड यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही तर भाजपमध्ये काय घडामोडी घडतात? ते पाहणं महत्त्वाचं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या घटनेची गंभीरतेने दखल घेतील का? अशी देखील चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु आहे.
लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.
चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.
चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.
खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा