Raigad Accident : राज्यात दिवसेंदिवस अपघातांचं प्रमाण वाढत चाललं आहे. त्याचदरम्यान, रायगडमध्ये एक भीषण अपघात झाला आहे. या अपघाता एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
टेम्पो MH 04 LE 7747 जो गुड्डे बिस्किट घेऊन खोपोलीहून पनवेलकडे जात होता, तो धडकेत उलटला. ट्रेलरही रस्त्यावरच पलटी झाला. या अपघातावेळी MH 46 BJ 239 क्रमांकाची स्कूटी रस्त्याच्या कडेला उभी होती. स्कूटीस्वार राशिद राजपूत जे फोनवर बोलत होते, त्यांना ट्रेलरने जोरात धडक दिली. त्याच्या शरीराला जबर मार बसला आणि तो जागीच रूक्ताच्या थारोळ्यात पडला. अपघात एवढा जबरदस्त होता की, काही क्षणातच त्याचा मृत्यू झाला.
कोट्यवधींच्या फसवणुकीचा सूत्रधार राजू नेर्लेकर सापडला, कोल्हापूर पोलिसांची सर्वात मोठी कारवाई
अपघात होताच परिसरातील स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड, प्राणीमित्र रामदास काईनकर, धनंजय गीध (हेल्फ फाऊंडेशन), पत्रकार अर्जुन कदम, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी जुंदरे, पोलीस घुले, गणेश पवार, गबहाले, नितीन मालुसरे, दिनेश महाडिक हे घटनास्थळी पोहोचले. मोकाट जनावरे सोडण्यामागे शेतकरी जबाबदार आहेत, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. IRB केवळ टोल उकळण्यापुरती मर्यादित असू नये, त्यांची जबाबदारी निश्चित झाली पाहिजे, असं नागरिकांनी सांगितलं.
Ahilyanagar News : सणासुदीच्या काळात अहिल्यानगर अशांत? बदलत्या राजकारणाचा बाजारपेठेवर परिणाम होण्याची भीती
या अपघातात राशिद राजपूत यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, वाहतूक यंत्रणा, रस्ता देखभाल यंत्रणा, आणि जनावरांचं व्यवस्थापन या तिन्ही बाबींकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. स्थानीय कार्यकर्त्यांनी दाखवलेली तत्परता व मदतकार्य कौतुकास्पद असलं तरी, प्रशासनाची उदासीनता गंभीर चिंतेचा विषय आहे. स्कूटीस्वाराला तात्काळ रुग्णालयात पाठवण्यात आलं, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. टेम्पो चालक टेम्पोखाली अडकलेला असतानाच त्याला सुखरूप बाहेर काढण्यात आलं.
या गंभीर अपघातानंतर 2 तास उलटल्यानंतरही IRB रस्ता देखभाल यंत्रणा घटनास्थळी पोहोचली नाही. या निष्काळजीपणावर सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड आणि निखिल मालुसरे यांनी संताप व्यक्त करत IRB यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.

