• Tue. Jun 9th, 2026
    भोपाळ प्रयोग शाळेचा अहवाल पॉझिटीव्ह, त्या पक्ष्यांचा मृत्यू  Bird Flu मुळेच

    Bird Flu In Solapur : सोलापूर शहरातील भविष्यात बर्ड फ्लूचा प्रसार इतरत्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी भीती प्रशासनाने व्यक्त केली आहे. सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यात आले आहेत. छत्रपती संभाजी महाराज तलाव परिसर व किल्लाबाग परिसर येथे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

    Lipi

    इरफान शेख, सोलापूर: सोलापुरात बर्ड फ्ल्यूचा शिरकाव झाला आहे. काही दिवसांपूर्वी सोलापूर शहरातील छत्रपती संभाजी महाराज तलाव परिसर आणि किल्ला बाग परिसरात कावळा, घार, बदक यांचा मृत्यू झाला होता. या अनैसर्गिक मृत्यूचे कारण हे बर्ड फ्लू असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सोलापूर जिल्हा प्रशासन अलर्ट झाले आहे. मध्य प्रदेश राज्यातील भोपाळ येथील हाय सिक्युरिटी ॲनिमल डिसीज लॅबोरेटरी या प्रयोगशाळेकडून अहवाल प्राप्त झाला आहे.

    सोलापूर जिल्हा प्रशासनाने केले प्रतिबंधात्मक उपाय

    सोलापूर शहरातील भविष्यात बर्ड फ्लूचा प्रसार इतरत्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी भीती प्रशासनाने व्यक्त केली आहे. सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यात आले आहेत. छत्रपती संभाजी महाराज तलाव परिसर व किल्लाबाग परिसर येथे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. हा दहा किलोमीटर त्रिज्येतील क्षेत्र हा सतर्क भाग म्हणून घोषित करण्यात आला आहे. बाधित क्षेत्राच्या ठिकाणी नागरिकांच्या हालचाली व इतर पक्षी व प्राण्यांच्या वाहतुकीस प्रतिबंध करण्यात आले आहे.

    पशुसंवर्धन विभाग अलर्ट मोडवर

    सोलापुरातील पशुसंवर्धन विभाग अलर्ट झाले आहे. आजारी पक्षांचे नमुने व मृत पक्षी तात्काळ तपासणीसाठी पाठवाले जात आहेत. पक्ष्यांचा पोस्टमार्टम अहवाल प्राप्त करून घ्यावा असेही जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. मृत पक्षांची विल्हेवाट शास्त्रोक्त पद्धतीने लावण्यासाठी किमान तीन फूट खोल खड्डा करून त्यामध्ये चूना पावडर व पक्षी पुरण्याची प्रक्रिया पूर्वपरवानगीने करण्यात यावी. या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस बंदोबस्त पुरवण्यास आदेशात नमूद करण्यात आले आहे.

    गेल्या काहि दिवसांपासून राज्यात बर्ड फ्लू च्या बातम्या वारंवार दिसून येत आहेत. आज (१४ फेब्रुवारी) धुळवडीचा दिवस आहे. त्यातही शुक्रवार आल्याने मांसाहार करणाऱ्या खवय्यांनी सकाळपासुनच मटणाच्या दुकानांवर गर्दी केल्याचे दिसून येत आहे. परंतु बर्ड फ्लू च्या भितीने नागरिकांची चिकनला कमीच मागणी असल्याने व्यापाऱ्यांचे नुकसान होत आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed