• Wed. Jun 10th, 2026
    Vijay Wadettiwar: ओबीसींचे अनेक दाखले बोगस; विजय वडेट्टीवारांचा महायुतीच्या मंत्र्यांवर गंभीर आरोप

    Vijay Wadettiwar: नागपुरात ओबीसी समाजाच्या महामोर्चाची माहिती माध्यमांना देण्यात आली. या पत्रपरिषदेला सर्वपक्षीय नेते, विदर्भातील विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

    wadettiwar(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. प्रतिनिधी, नागपूर: सरकारने काढलेल्या शासन निर्णयामुळे ओबीसी समाजाच्या हक्काच्या आरक्षणाला धक्का लागला आहे. अनेक बोगस दाखले देण्यात येत आहेत. या सरकारमधील मंत्री, मोठे नेते हे बोगस दाखले देण्यासाठी प्रशासनावर दबाव टाकत आहेत, असा गंभीर आरोप काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शनिवारी पत्रपरिषदेत केला.
    Maharashtra TimesAjit Pawar: …तर मंत्रिपद काढून घेऊ! राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना अजितदादांचा थेट इशारा, काय कारण?
    सरकारने काढलेल्या शासन निर्णयामुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, असे मुख्यमंत्री आणि ओबीसी उपसमितीतील मंत्री सांगत असले तरी ओबीसींच्या हक्कावर गदा येत आहे. म्हणूनच हा शासन निर्णय रद्द व्हावा, यासाठी सकल ओबीसी संघटनांचा महामोर्चाचे आयोजन नागपुरात करण्यात आले आहे, अशी माहिती वडेट्टीवार यांनी दिली.
    Maharashtra TimesMaharashtra Weather Update: नवरात्रीत मेघगर्जना! २५ सप्टेंबरपासून राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता, IMDकडून अलर्ट जारी
    नागपुरात १० ऑक्टोबर रोजी यशवंत स्टेडियम ते संविधान चौक असा सकल ओबीसी संघटनांचा मोर्चा निघणार आहे. समाजातील कोणत्याही घटकाला आरक्षण द्यायचे तर जातिनिहाय जनगणना करणे आवश्यक आहे. सोबतच त्या-त्या समाजाच्या लोकसंख्येनुसार आरक्षण दिले पाहिजे. आता मात्र ओबीसींमध्ये मोठ्या प्रमाणावर घुसखोरी होणार आहे. असे असताना ओबीसींना धक्का कसा लागणार नाही, याचे स्पष्टीकरण सरकारने द्यावे, अशी भूमिका वडेट्टीवार यांनी मांडली. ओबीसींच्या हक्कासाठी लढायचे असल्यास प्रत्येकाने या मोर्चात सहभागी झाले पाहिजे. जे कोणी सरकारच्या शासन निर्णयाविरोधात आहेत, त्यांनी आपला पक्ष, संघटना यांपलीकडे जाऊन मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन पत्रपरिषदेतून करण्यात आले.

    उपसमिती फक्त नावालाच !
    राज्य सरकारने नेमलेली उपसमिती कोणत्या कामाची नाही. इथे महाज्योतीचे पैसे मिळत नाही तिथे उपसमिती काय काम करणार, ओबीसींच्या हक्कासाठी काय लढणार’, असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. एकीकडे मराठा समाजाच्या उद्योजकांना १३ हजार कोटी दिल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगतात. मग ओबीसी समाजासाठी, त्यांच्या महामंडळासाठी किती निधी दिला, हे सरकारने सांगावे, सरकारने नेमलेली उपसमिती ही फक्त नावाला आहे, अशी टीकाही यावेळी वडेट्टीवार यांनी केली.
    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा